गरीब शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला डॉ. मनोज कदम यांचा प्रवास संघर्ष, शिक्षण आणि कर्तृत्वाने घडलेला आहे. स्वतःच्या मेहनतीने नोकरी मिळवून त्यांनी पुढे उद्योग क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकले आणि भारत सरकारचा पहिला राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार मिळवला. या पुस्तकात त्यांनी उद्योग-व्यवसायातील प्रत्यक्ष अनुभव मांडले आहेत. नवीन उद्योजकांनी काय करावे आणि काय टाळावे याचे मार्गदर्शन यात आहे. सामान्य तरुणाने यशस्वी उद्योजक कसे बनावे याचा हा प्रॅक्टिकल रोडमॅप आहे. व्यवसाय सुरू करून तो स्थिर आणि यशस्वी करण्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी मार्गदर्शक ठरते.

