Kohjad (कोहजाद)

450

Availability: 99 in stock

SKU: 9788195319114 Category: Tag:

कोहजाद म्हणजे विद्रोह.
हा विद्रोह केलाय आपल्याच नैसर्गिक संपत्तीला, शिक्षणाला मुकलेल्या भुमीपुत्रांनी.. बलुचिस्तानच्या सुपूत्रांनी. बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच एक भाग, पण पाकिस्तान त्यांना कायम सावत्रपणाने वागवत, कायम मागासलेले ठेवण्याचा प्रयत्न करी.

या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला कोणी ना कोणी योद्धा उभा राहणारच होता. कारण संघर्षातील शेवट हा पुढील पिढ्यांना लढण्यासाठी प्रेरणा देणारा असतो आणि ह्या अन्यायाविरुद्ध संघर्ष उभारला तो ‘अकबर खान बुग्ती’ यांनी..

खान बाबांनी उभारलेला संघर्ष हा बलुचिस्तानच्या तरूणांना प्रोत्साहन देणारा होता. लढता लढता मरण पत्कारावे लागले तरी खानबाबांच्या संघर्षाची प्रेरणा घेऊन अनेक नवे योद्धे बलुचिस्तानच्या या भूमीसाठी, तिला स्वातंत्र्य करण्यासाठी तयार होत होते.

या बलुचिस्तानच्या लढ्यात आपले मराठेही खान बाबाच्या सोबतीला होतेच.. बुक्ती मराठा…
पानिपतच्या युद्धानंतर जे मराठे भारतात पोहोचू शकले नाहीत त्यांना अब्दालीबरोबर त्याच्या देशात गुलाम म्हणून नेण्यात आले. त्यांचे बळजबरीने धर्मांतरही करण्यात आले. पण तरीही त्यांची ओळख थोडीच पुसली जाणार होती? जेव्हा अब्दाली संकटात होता तेव्हा याच मराठ्यांनी त्याचा जीव वाचवला होता..

कालांतराने जन्माने आणि कर्माने मराठी असलेले हे योद्धे बलुचिस्तानात स्थायिक झाले. बलुचिस्तानच्या हक्कासाठी खानबाबाबरोबर संघर्षांतही उभे राहिले.

जळणं आणि जाळणे हा बलुचिस्तानच्या आयुष्याचा अविभाज्य घटकच झाला होता. पाकिस्तानने त्यांच्या विरोधात केलेले घातपात आणि बलुचिंनी या घातपाताला कधी तडकाफडकी तर कधी संयमाने दिलेली उत्तरे, त्यांचा संघर्ष आपल्याला ‘कोहजाद’मध्ये अनुभवायला व वाचायला भेटतो.
शेवटी कसंय, आयुष्यात त्यागाशिवाय कधीही आणि कुठलीही गोष्ट घडत नसते.

Weight 420 g
Number of Pages

496

Writer

Abhishek Kumbhar

Reader's Reviews

  1. स्वप्निल घुमटकर
    फिरस्ते, काहून ही पुस्तके ज्यांनी वाचलीयेत तो या ‘अभिषेक कुंभार’ सरांच्या लेखणीचा चाहता झाला नाही तर नवलच. या लेखकाला शब्दसम्राट का म्हणतात हे तुम्ही यांचं “कोहजाद” हे पुस्तक वाचल्यावर आपसूकच समजून जाल. राष्ट्रीय राजकारण बर्‍याच जणांना माहीत असतेच पण इकडं ‘कोहजाद’ मधून अभिषेक कुंभारांनी पार आंतरराष्ट्रीय लेव्हलचं राजकारण आपल्यापुढे सादर केलंय…
    “कोहजाद”…
    कोहजाद म्हणजे विद्रोह..
    हा विद्रोह केलाय आपल्याच नैसर्गिक संपत्तीला, शिक्षण यांना मुकलेल्या भुमीपुत्रांनी… बलुचिस्तानच्या सुपूत्रांनी… बलुचिस्तान पाकिस्तानचाच एक भाग. पण पाकिस्तान त्यांना कायम सावत्रपणाने वागवत, कायम मागासलेले ठेवण्याचा प्रयत्न करी. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला कोणी ना कोणी योद्धा तर उभा राहणारच. कारण संघर्षातील शेवट हा पुढील पिढ्यांना लढण्यासाठी प्रेरणा देणारा असतो आणि हा अन्यायाविरुद्ध संघर्ष उभारला तो ‘अकबर खान बुग्ती’ यांनी..
    खान बाबांनी उभारलेला संघर्ष हा बलुचिस्तानच्या तरूणांना प्रोत्साहन देणारा तर होताच आणि लढता लढता मरण पत्कारावे लागले तरी खानबाबांच्या संघर्षाची प्रेरणा घेऊन अनेक नवे योद्धे बलुचिस्तानच्या या भूमीसाठी, तिला स्वतंत्र करण्यासाठी तयार होतेच…
    या बलुचिस्तानच्या लढ्यात आपले मराठेही खान बाबाच्या सोबतीला होतेच, बुक्ती मराठा…
    पानिपतच्या युद्धानंतर जे मराठे भारतात पोहचू शकले नाहीत त्यांना अब्दाली बरोबर त्याच्या देशात गुलाम म्हणून नेण्यात आले. बळजबरीने धर्मांतरही करण्यात आले, पण तरीही त्यांची ओळख थोडीच पुसली जाणार होती?
    जेव्हा अब्दाली संकटात होता तेव्हा याच मराठ्यांनी त्याचा जीव वाचवला.
    कालांतराने जन्माने आणि कर्माने मराठी असलेले हे योद्धे बलुचिस्तानात स्थायिक झाले. बलुचिस्तानच्या हक्कासाठी खानबाबा बरोबर संघर्षांत उभे राहिलेही.
    जळणं आणि जाळणे हा बलुचिस्तानच्या आयुष्याचा अविभाज्य घटकच झाला होता. पाकिस्तानने त्यांच्या विरोधात केलेले घातपात आणि बलुचिंनी या घातपाताला कधी तडकाफडकी तर कधी संयमाने दिलेली उत्तरे, त्यांचा संघर्ष सगळकाही कोहजाद मध्ये आपल्याला अनुभवायला, वाचायला भेटत आहे.
    शेवटी कसंय, आयुष्यात त्यागाशिवाय कधीही आणि कुठलीही गोष्ट घडत नसते.
    आणि हो बाहुबलीला कटप्पाने का मारले हे जसे बाहुबलीचा दुसरा भाग येईपर्यंत लोकांमध्ये उत्सुकता होती, तशीच नबीने मेहबुबला का मारले असेल ही उत्सुकता वाचकांना कोहजादचा दुसरा भाग हातात येईपर्यंत नक्कीच राहील.
  2. नितीन चव्हाण
    न्यू ईरा पब्लिशिंग हाउसने पब्लिश केलेली आणि श्री अभिषेक कुंभार यांनी लिहिलेली एक उत्तम कादंबरी आज वाचून संपली. या पुस्तकाबद्दल समीक्षा लिहिण्याचा मोह आवरला नाही म्हणून हा लेखन प्रपंच. तर आपण पाकिस्तान मधील सिंध प्रांत, पंजाब प्रांत, खैबर पख्तुनिस्तान व बलुचिस्तान या भागाबद्दल वर्तमानपत्रामध्ये आणि बातम्यांमधून खूप काही वाचत-ऐकत असतो. आता मागच्या दोन आठवड्यात देखील एका महिलेने स्वतः च्या अंगाला बॉम्ब लावून एक स्फोट घडवला होता. या गोष्टी तिथे का घडत असतात ते या पुस्तकातून आपल्याला समजेल. हे पुस्तक वाचल्यावर या भागांची, तसेच ही कथा ज्या भागावर आहे तो बलुचिस्तान आणि सबंध पाकिस्तान चे राजकारण, समाजकारण आणि तिथल्या नागरिकांनी केलेली स्वातंत्र्याची आंदोलने या गोष्टीही खूप चांगल्या प्रकारे समजतील. ज्यांना आंतरराष्ट्रीय संबंध आणि विविध राजकीय कंगोरे समजून घेण्याची आवड आहे, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचायला हवे.
    पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांनी अनुभवलेल्या भयाण वास्तव्यावर भाष्य करणारे हे पुस्तक आहे. या बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले नागरिक (वंशाने मराठे) हा भाग स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आणण्यासाठी कशाप्रकारे पाकिस्तान सरकार सोबत वर्षानुवर्षे लढत आहेत, याचे वर्णन खूप चांगल्या प्रकारे या लेखकांनी खूप सुंदर अशा कथेतून आपल्या समोर मांडले आहे. ही माणसे धर्माने मुसलमान झाली, पण मनाने ते मराठाच राहिले. हा आपल्या संस्कृतीचा चालत आलेला वारसा दहा बारा पिढ्यांनंतरही आम्ही बुग्ती मराठा किंवा बलूच मराठा म्हणून अजूनही ते आपली ओळख मिरवत आहेत. यामध्ये चीन, पाकिस्तान, भारत, रशिया, इराण, अफगाणिस्तान, तालिबान, अमेरिका, बलुचिस्तान ह्या सर्व देशांच्या आपापल्या भूमिका आणि या लढ्यामधील नायक व त्याचं कुटुंब जे या लढ्याचे नेतृत्व करत होते, ते नवाब अकबर खान बुग्ती, त्याचे वडील भाऊ फवादने दिलेले बलिदान आणि नंतर परिस्थितीने आपल्या हुशारी आणि साहसी वृत्तीमुळे या लढ्याचे नेतृत्व आपल्याकडे आल्यावर पाकिस्तानी सरकारच्या समोर उभे केलेले आवाहन, हे सर्व खूप रंजक आणि प्रेरणादायी वाटते.
    या कथेमधील जी पात्र आहेत ती हळूहळू एकदम आपलीशी वाटत जातात. कथेचा नायक, महेबूब व रिपोर्टर चांदनवाब यांच्यातील जी चर्चा आहे त्यात बलुचिस्तानमधील सामाजिक, शैक्षणिक आणि भौतिक प्रश्न असतील ते घेऊन लढत असलेले छुपे युद्ध, त्यात आपल्या जवळच्या लोकांचे मृत्यू आणि त्याच्या बदल्यात ते सरकार आणि आर्मीला वेगवेगळया मार्गाने कसा धडा शिकवतात, हे खूप रंजक अशा पद्धतीने मांडले आहे.
    मुझे जंग-ए-आजादी का मजा मालूम है,
    बलुचिस्तान पर जुल्म कि इंतेहा मालूम है,
    मुझे जिंदगी भर पाकिस्तान मी जिने कि,
    दुआ न दो, मुझे पाकिस्तान में,
    इन साठ साल जीने कि सजा मालूम है|
    सिनेटर हबीब जलील बलूच यांनी गायलेला तराणा प्रत्येक बलूच नागरिकाच्या मनात कसा कोरला आहे, हे वेळोवेळी जाणवत राहते. बलुचिस्तानचा आपल्या स्वातंत्र्याचा आणि अस्तित्वाचा लढा म्हणजे कोह्जाद होय. लेखकांनी ४९५ पानांची ही कादंबरी उत्कृष्ट पद्धतीने लिहिली आहे. लेखकाने शेवटच्या पानावर #क्रमशः हा शब्द टाकून पुढील भागाची उत्सुकता अजून वाढवली आहे. ज्या प्रकारे शेवटी नबी मेहेबुबच्या पाठीत गोळी मारतो, तेव्हा आपल्या मनात नबी ने मेहेबूब को क्यू मारा? हा प्रश्न नक्कीच घुटमळत राहणार आहे. जसा “कटप्पा ने बाहुबली को क्यू मारा?” हा पडला होता. पुढील भागाच्या प्रतीक्षेसह लेखकाला शुभेच्छा.
  3. अमोल शेळके
    प्रिय अभिदादा,
    सर्वप्रथम आपणास माझा क्रांतिकारी सलाम…! यासह आपल्या ‘कोहज़ाद’ या सर्वोत्तम कादंबरीबद्दल आपले मनस्वी आभार आणि धन्यवाद…
    दादासाहेब पुस्तक प्रकाशित होण्याआधीपासून हातात पडेपर्यंत ते वाचण्याप्रतिचा माझा अट्टाहास किती होता, ते आपल्या संभाषणातून तुम्हाला ज्ञात असेलच. सदर पुस्तक सिद्धार्थ दादा यांच्या मदतीने घरपोच झाल्यानंतर ते एकसलग वाचण्यापासून स्वतःला रोखू शकत नव्हतो, परंतु मध्येच परीक्षेने अडसर घातल्याने वाचण्यास आणि अर्थातच प्रतिक्रिया कळण्यास विलंब झाल्याबद्दल दिलगिरी.
    दादासाहेब सदर पुस्तक वाचत असताना अनेकदा लेखकांकडून पुस्तकातील एखादा विशिष्ट मुद्दा सुटल्याचा भास सुरुवातीला होत असे, परंतु बलुचिस्तान मध्ये घडलेल्या प्रत्येक राजकीय उलथापालथींच्या हालचाली वाचकांसमोर यथारुप सादर करण्यासाठी लेखकानी अनोख्या पद्धतीने या लेखाची निर्मिती केल्याने पुढे चांद नामक पत्रकाराचं पात्र जसं जसं उलगडू लागलं तसं तसं ही मुलाखत रंगत भरू लागली, आणि लेखकांची हातोटी लेखात जिवंतपणाचा भाव निर्माण करत असल्याचे आढळून आले.
    खानबाबांचा वृद्धावस्थेतील प्रेरणादायी स्वातंत्र्यलढा मरगळलेल्या तरुणाईला आत्मविश्वासाचं जीवामृत पाजून नव्याने नियती सोबत कडवा प्रतिकार करण्यास भाग पाडतो. जुलमी, अन्याय-अत्याचाराच्या गर्तेत गुंतलेल्या समाजाला स्वाभिमानाचं जीवन बहाल करण्यासाठी नव्या तरुणाईमध्ये सदर पुस्तक वाचल्यानंतर जाणिवांची ज्वलंत ऊर्जा संचारल्यावाचून राहणार नाही, असा प्रत्यय या लेखातून येतो.
    दादासाहेब सदर पुस्तक वाचत असताना बलुचिस्तानमध्ये बलुच मराठा किंवा बुक्ती मराठा कसा आला? कोहजाद, मेहबूब, खानबाबा, फवाद हे सर्व नावाने आणि त्यांच्या तोंडी असलेल्या भाषेवरून तर मुस्लीम धर्मीय असल्याचे जाणवत आहे मग हे मराठा कसे? अशा प्रश्नांमध्ये सतत घोंगावत असताना जवळपास तीनशे पानं चाळून अर्धअधिक पुस्तक वाचत पुढे आल्यानंतर पानिपतचे युद्ध आणि मराठ्यांचं बलुचिस्तानमध्ये निर्माण झालेलं वास्तव्य लक्षात आलं. पानिपतच्या युद्धात अहमदशाह अब्दालीच्या हाती लागलेल्या या मराठा योध्यांना गुलामगिरी तर स्वीकारावी लागलीच, परंतु इच्छा नसतानाही त्यांचं इस्लाम धर्मामध्ये धर्मांतर झालं. हे भयावह वास्तव मला हे पुस्तक वाचल्यानंतरच समजलं. जन्माने आणि कर्माने मराठा असलेले हे योद्धे स्वतःचे वेगळेपण शेती, लोहार, चांभार, कुंभाराचा व्यवसाय करत आणि बलुचिस्थानला स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक म्हणून पुढे येत सिद्ध करतात. ते आजीवन निगराशी वार करत मोठा क्रांतीचा लढा लढण्यापासून ना स्वतःला रोखू शकले ना आपल्या पिढीला हे आम्हाला अभ्यासायला मिळालं. सदर कादंबरी हाती आल्यानंतर ती ४९६ पानांची आहे म्हणून वाचायला नको किंवा आपल्याला ती वाचण्यास उसंत मिळणार नाही, असे शंकास्पद प्रश्न मनात उत्पन्न होण्याचं कुठलंच कारण नव्हतं. कारण आम्हा वाचकांना रोज नवनवीन गोष्टी माहीत करून घेण्यासाठी विशेष आनंद असतो.
    एकूण ‘कोहज़ाद’ (किरदार-ए-सियासत) ही रचना सर्वोत्तम आणि दर्जेदार असून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सैनिकांच्या अंगी किती त्याग, समपर्ण, धैर्य, लढाऊ बाणा, प्रसंगावधान राखत संयमी वृत्तीचे ज्ञान असावे लागते, आणि गुप्तहेर किंवा मुखवट्यांची भूमिका निभावत असताना भावनांना थारा न देता कसं निष्ठुर वागून आपल्या अनमोल कार्याला सजग राहून ध्येयापर्यंत घेऊन जावं लागतं, ते या सर्व भूमिकांतून आम्हा वाचकांच्या दृष्टीस पडते आणि नियतीने स्वातंत्र्य योध्यांसमोर वाढवून ठेवलेल्या परिस्थितीचे दर्शन घडते.
    दादासाहेब सदर कादंबरी वाचून झाल्यानंतर नबीने मेहबूबला का मारले? तसा आदेश भारतीय गुप्तचर यंत्रणेचा नबीला होता का? कोहजादचे पुढे काय झाले? त्याने आपली चळवळ/ स्वातंत्र्यलढा चालूच ठेवला का? की त्याचाही काही घातपात झाला? असे अगणित अनुत्तरीत असलेले प्रश्न मात्र ‘क्रमशः’ या एका शब्दाने आम्हा वाचकांना पुढील लेखाची जशी चातक पक्षाने पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहावी अगदी तशीच आस या एका शब्दाने लावून ठेवली आहे. आपण हाही हट्ट लवकरच पूर्ण कराल असा विश्वास आहे.
    सोबत, मोरारजी देसाई यांच्या नादान कर्तेपणामुळे ज्या ५२ भारतीय गुप्तचरांना प्राणार्पण करावे लागले, त्या गुप्तहेरांच्या स्मृतीस क्रांतिकारी अभिवादन व्यक्त करत त्यांना सलाम. ज्या बालिश, बुद्धीभ्रष्ट पंतप्रधानांनी हे सर्व कृत्य घडवलं किंवा त्यांना असं करण्यास ज्यांनी कोणी भाग पाडलं असेल त्यांचा निषेधही व्यक्त करतो.
    दादासाहेब आपण सदर पुस्तक लिहित असताना वास्तव मांडायला कुठलाही कसूर केला नाही त्याबद्दल आपले अभिनंदन व आपल्या या सर्वोत्कृष्ट लेखणीला सलाम.
    सोबत नव्या लेखाच्या आतुरतेसह आपणाला वैयक्तिक व सामाजिक जीवनासाठी प्रेमळ शुभेच्छा.
  4. आलोक सस्ते
    ‘कोहजाद… हम खून की किश्ते तो बोहोत दे चुके, लेकिन ए खाक-ए-वतन ये क़र्ज़ अदा क्यों नहीं होता..’
    पानिपतचा वैभवशाली इतिहास मिरवणाऱ्या नायकाची आधुनिक काळातील गोष्ट. युद्धानंतर अफगाणिस्तानात फरफट झालेल्या मराठ्यांच्या संघर्षाची गोष्ट. एका गुलामगिरीतून बाहेर पडून दुसऱ्या गुलामगिरीत होरपळणाऱ्या संपूर्ण प्रदेशाची गोष्ट. इराण, पाकिस्तान, चीनने अक्षरशः अनेक दशके लचके तोडलेल्या स्वतःच्याच भूमीत गैर बनून राहिलेल्यांची गोष्ट. शेकडो वर्षे इराण्यांनी, अफगाण्यांनी, मुघलांनी, इंग्रजांनी बनवलेल्या सीमारेषांमध्ये स्वातंत्र्य गमावलेल्या एका दुर्दैवी ‘देशाची’ गोष्ट. एका कधीही स्वतंत्र न झालेल्या देशाच्या स्वातंत्र्ययुद्धाची गोष्ट, कोहजाद!नवीन पुस्तकासाठी मनःपूर्वक शुभेच्छा अभिषेक कुंभार, हे पुस्तक केवळ कादंबरी न ठरता गेल्या अनेक दशकांच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा, सत्तांतरांचा, दहशतवादाच्या उदयाचा मागोवा घेणारा उत्कृष्ट संदर्भग्रंथ सुद्धा ठरेल यात शंका नाही.
  5. विजय देवडे
    पानिपत सर्वांनाच माहित आहे, त्यानंतर मराठी सैनिकांच्या झालेल्या हालअपेष्टा व त्यातही त्यांची अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द हे आजही बलोच मराठा यांच्यामध्ये जागी आहे. त्यांच्याबद्दल सांगणारी ही कादंबरी वाचकांना मिळालेली अमृत भेट आहे. या कादंबरीबद्दल लेखकाचे विशेष आभार..
    मी नेहमीच अशा दर्जेदार कादंबरीचे स्वागत करतो. वाचनाने आपल्या विचारांना योग्य दिशा मिळण्यासाठी मदत होते. याच लेखकाची मागील काहून ही कादंबरी सुद्धा खूप छान आहे. आपल्या इतिहासाला आपल्यालाच न्याय द्यावा लागेल त्यासाठी त्याला समजून घेण्याची गरज आहे. एकदा ही कादंबरी वाचली की तुम्ही त्याच्या प्रेमातच पडता.
    बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये लढणाऱ्या मराठा बांधवांना शुभेच्छा. आम्ही कोहजाद पार्ट टू ची वाट बघतोय..
Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us